न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा झाली असून, विराट कोहलीच्या नेृत्त्वाखालील संघ येत्या २२ सप्टेंबरपासून न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर आज दुपारी बारा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.