साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका मांडली. जन्मस्थळाच्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. चर्चेतून मार्ग काढण्यात येईल. कुणाच्या भावना दुखावणार नाही, असं आवाहन पवार यांनी केलं. त्याचबरोबर दारूबंदी उठवण्यासंदर्भात आलेल्या वृत्तावरही अजित पवार यांनी भूमिका मांडली.