Raj Thackeray: ‘तुमची जमीन अमराठी व्यापरांना विकताय?’; बारसूवरून राज ठाकरेंचा कोकणवासीयांना सवाल
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात सरकारने रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित केला आहे. मात्र, या प्रकल्पाला अनेकांनी कठोर विरोध दर्शवला आहे. याप्रकल्पाबाबत राज ठाकरे मात्र मौन बाळगून होते. या प्रकल्पाबाबत राज ठाकरेंची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर, रत्नागिरीच्या सभेतून राज ठाकरेंनीही बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. तसंच, अशा प्रकल्पांना जमिनी देणाऱ्यांवरही राज ठाकरेंनी टीका केली आहे