मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीति आयोगावर सोपविली आहे. त्यानुसार या भागाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) तीन हजार कोटी डॉलर (३०० बिलियन डॉलर्स) नेण्यासंदर्भातील आराखडा नीति आयोग तयार करणार असून त्यांना राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक पथक साह्य करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याचा हा डाव आहे हा भाजपाचा मनसुबा उघड झाल्याचं म्हटलं आहे.