मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा पुन्हा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एका भागवत कथा कार्यक्रमासाठी जरांगे जालन्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची गाडी अडवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी काही मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. घोषणा दिल्या की ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करायचा, हा नवीन नियम सरकारने काढला आहे का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे.