गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने आणि पर्यावरणपूरक विकासाचे धोरण स्वीकारले असून एका वेळी किंवा अनियंत्रित…