मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची समाजमाध्यमात चांगलीच चर्चाही रंगली.Read More
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील शेवटचा इगतपुरी-आमणे टप्पा गुरुवारी वाहतुकीसाठी खुला झाला असून आता संपूर्ण महामार्गावर प्रवास सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी…
मुंबईकर, ठाणेकरांना समृद्धी महामार्गाचे प्रवेशद्वार अर्थात आमणे गाठणे, तसेच नागपूरवरून अतिजलद आमणेपर्यंत आल्यानंतर पुढे ठाणे, मुंबई गाठणे कठीण झाले आहे…
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘ॲक्सेस कंट्रोल ग्रिड’ उभारणार असून राज्याच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत आठ तासांत प्रवास शक्य होणार आहे,…
मुंबई – नागपूर दरम्यानच्या ७०१ किमी लांबीच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’च्या (एसटी) बसगाड्यांना वाहतुकीस…
Samruddhi Highway Inauguration Updates : समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे…