मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची समाजमाध्यमात चांगलीच चर्चाही रंगली.Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गाजावाजा केलेल्या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या तीन महत्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांना शेतकऱ्यांच्या भूसंपादनातील अडचणींमुळे मोठा झटका…
मुंबई-नाशिक महामार्गावरून मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गाला जाण्यासाठी, तसेच, डोंबिवलीतून माणकोली पुलाने मुंबई-नाशिक महामार्गावर जाण्यासाठी आवश्यक ठिकाणी असलेल्या बोगद्यांची कामे…
राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हजारो किमी लांबीचे रस्त्यांचे जाळे विणण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) आहे.