मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची समाजमाध्यमात चांगलीच चर्चाही रंगली.Read More
संबंधित प्रकार हा खिळे ठोकण्याचा नसून रस्त्याच्या अंतर्गत भेगा, तडे बुजवण्याच्या कामानिमित्त नोजल्सद्वारे रसायन सोडण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले…
Nagpur Mumbai Expressway Bridge News: समृद्धी महामार्गावर खिळे टाकण्यात आल्याची ध्वनिचित्रफित बुधवारी सकाळपासून मोठी प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही ध्वनिचित्रफित…
राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्ग या दोन महामार्गांवर वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना…