मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची समाजमाध्यमात चांगलीच चर्चाही रंगली.Read More
निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने फेरनिविदा काढण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर ओढावली आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरील आवश्यक त्या सोयी सुविधांची प्रतीक्षा लांबली…
११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकपर्ण झाले. केंद्र सरकारचा हा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र,…
मुख्यमंत्री-उपमुख्यंत्र्यांच्या या ड्राईव्हची सर्वत्र चर्चा सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनीही या ड्राईव्हबाबत विचारणा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…