scorecardresearch

आत्महत्या

स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य म्हणजे आत्महत्या होय. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपले जीवन निरर्थक किंवा नीरस वाटते तेव्हा त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे (Subside) विचार येतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. जीवनामध्ये सतत येणारं अपयश, आर्थिक संकटे, नातेसंबंधांतील गुंतागुत अशी आत्महत्येमागील कारणे असण्याची शक्यता असते. काही वेळेस मानसिक आजारांमुळेही आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येत असतात. मानसिक त्रास, असहाय्यता संपवण्याच्या उद्देशाने लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. आकडेवारीनुसार, जगभरात दर वर्षी सुमारे दहा लाख लोक आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, मानवी मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीमध्ये आत्महत्या हे तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे.


ब्रिटीश काळातील भारतीय दंड संहिता १८६० मध्ये असलेल्या कलम ३०९ नुसार आत्महत्या करणे हे कायद्याने गुन्हा आहे असे नमूद करण्यात आले होते. या कलमानुसार, “जो कुणी आत्महत्येचा प्रयत्न करील आणि असा अपराध घडण्याच्या दृष्टीने कोणतीही कृती करील त्याला एक वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील” हे कलम जुनाट असून त्यावर अनेकदा टीका झाली. १९७१ मध्ये हे कलम रद्द करण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केले गेले. पुढे अनेकदा त्यावर चर्चा झाल्या. २००८ मध्ये विधी आयोगाच्या २१० व्या अहवालामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय आणि मनोरुग्ण उपचारांची गरज आहे, शिक्षेची नाही. असे नमूद करण्यात आले. पुढे २०१७ मध्ये याविशयी विधेयक आणून २०१८ मध्ये ते अमलात आले.


मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (१) मध्ये म्हटले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ व्याख्येनुसार काहीही असले तरी आत्महत्येचा प्रयत्न करणारी कोणतीही व्यक्ती, गंभीर ताणतणावात असल्याचे गृहित धरले जाईल आणि या संहितेमनुसार सदर व्यक्तीविरोधात खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही.मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (२) नुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने पुन्हा अशा प्रकारच्या कृत्याची पुनरावृत्ती करू नये किंवा तसा धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित सरकारने अशा व्यक्तीची काळजी घेणे, त्याला उपचार देणे आणि त्याचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सरकारचे हे कर्तव्य आहे.


या व्यतिरिक्त आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे हा भारतामध्ये मोठा गुन्हा मानला जातो. कलम १०६ नुसार, “एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास अशा आत्महत्येस जर कुणी प्रवृत्त केले असेल तर त्याला दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच द्रवदंडांची शिक्षाही ठोठावली जाऊ शकते.” तर कलम १०५ नुसार “१८ वर्षांखालील कोणतीही व्यक्ती, मानसिक आजार असलेली कोणतीही व्यक्ती, कोणतीही भ्रमिष्ट व्यक्ती किंवा नशेच्या अमलाखाली असलेली व्यक्ती आत्महत्या करेल आणि अशा व्यक्तीच्या आत्महत्येसाठी जर कुणी जबाबदार असेल तर त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची किंवा दहा वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या मुदतीचा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते.”


प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास, दु:ख, वेदना असतात. प्रत्येकजण संकटांचा सामना करत असतो. तेव्हा अपयशाने खचून न जाता सतत संघर्ष करणे आवश्यक असते. आत्महत्या करणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्यास तुम्ही जवळच्या व्यक्तीची मदत घेऊन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करु शकता. शासनही त्यामध्ये मदत करते. सरकारच्या अनेक हेल्पलाइन्स मानसिकदृष्टा खचलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी तत्पर असतात.


Read More
Farmers staged a sit-in protest in front of the Land Records Office on Monday
कोल्हापुरात महामार्ग मोजणी विरोधात भूमी अभिलेख कार्यालयास टाळे; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी नागपूर मार्गापैकी अंकली ते चौकात या मार्गावर संपादित जमिनीसाठी चौपट भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Youth Congress protests at three places in Mumbai over doctor suicide
युवक काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन; फलटण रुग्णालयातील डॉक्टर आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी

गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंट तसेच वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप व महायुती सरकारविरोधात…

Youth Congress Protests CM Residence fadnavis Varsha Bungalow Phaltan Doctor Sampada Suicide Justice Politics mumbai
युवक काँग्रेस ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालणार; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून न्यायाची मागणी…

Youth Congress Protests : भाजपच्या माजी खासदारांच्या छळामुळे डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करत न्यायासाठी तीव्र…

Avinash Dhande suicide, Beed revenue officer death, Chhatrapati Sambhajinagar news, government job stress Maharashtra, police investigation Beed, official promotion denial, Maharashtra suicide cases,
बीड नगर परिषदेच्या छतावर कर्मचाऱ्याची आत्महत्या; चार अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

बीड नगर परिषदेच्या वसुली विभागात कार्यरत असलेले अविनाश धांडे ७ नोव्हेंबर रोजी रात्री कार्यालयाच्या छतावरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अवस्थेत…

Retired principal commits suicide by jumping into Wainganga
Suicide Case: सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने वैनगंगेत उडी घेऊन संपविले जीवन; दोन दिवसानंतर…

दिलीप बावनकर हे तीन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. नदीत बुधवारी (दि.५) उडी घेतली होती, दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला.

Will not support Parth Pawar as the head of the family - Sharad Pawar's clear stance
पुणे जमीन घोटाळाप्रकरणी शरद पवार प्रथमच बोलले; म्हणाले, “कुटुंबप्रमुख म्हणून पार्थ पवारला…” फ्रीमियम स्टोरी

अकोल्यात शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त आले असताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत…

Jaipur School Bullying suicide case
वर्गातल्या मुलांचा मानसिक छळ असह्य होऊन ९ वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; पालकांचे शाळेवर गंभीर आरोप

Jaipur School Suicide: जयपूरच्या नामांकित शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून नऊ वर्षांच्या मुलीनं आत्महत्या केली. यानंतर पालकांनी शाळेवर गंभीर आरोप…

mla bhaskar Jadhav son vikrant and eight other booked for assaulting contractor
Pimpri Chinchwad Crime: पैशाची परतफेड न करता दमदाटी; एकाची आत्महत्या…

पिंपरी-चिंचवडमध्ये कर्जाच्या परतफेडीसाठी दमदाटीमुळे आत्महत्या, कंपनीची १६ लाखांची फसवणूक आणि अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला अशा गंभीर घटनांची नोंद झाली.

Dhule student suicide, mental stress in students, exam pressure effects, student counseling India, mental health awareness students, academic stress solutions,
‘जयदीप’च्या आत्महत्येमागचे रहस्य काय?

जिल्ह्यात पुन्हा एक हृदयद्रावक घटना घडली. सोनगीर (ता.धुळे) येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

farmer suicied
कर्ज भरण्यासाठी बँकेचा तगादा, शेतकरी महिलेची आत्महत्या; आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल

वाढते कर्ज, नापिकी आणि सततच्या आर्थिक विवंचनेने त्रस्त झालेल्या यशोदा आबाजी राठोड (६८) या शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना…

youth dies by suicide after social media threats in Chhatrapati Sambhajinagar
लघुशंकेची जागा चुकल्याने तरुणावर आत्महत्येची वेळ

रेल्वेस्थानकावरील छत्रपती संभाजीनगरच्या फलकाच्या खाली अजाणतेपणी लघुशंका केल्यानंतर ज्या तरुणाचे (वय २७) चलचित्र समाजमाध्यमावर टाकण्यात आले.

संबंधित बातम्या