
जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी असलेल्या सियाचीनच्या निर्लष्करीकरणाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी असलेल्या सियाचीनच्या निर्लष्करीकरणाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
देशाचे आणि पर्यायाने देशातील अनेक कुटुंबांचे अर्थचक्र मंदावून चालणार नाही.
जैववैविध्य संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने अलीकडेच संसदेमध्ये सुधारणा विधेयक मांडले.
आजवर जगात कुठेही असे सिद्ध झालेले नाही की, हा विषाणू मुखपट्टी भेदून तुमच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे करोनाविरोधातील लढय़ामध्ये मुखपट्टी…
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी घडवून आणण्याच्या सुधारणांचा एक भाग म्हणून मतदार याद्या आधार क्रमांकाला जोडण्यात…
उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीत ‘काशी’ होण्याची वेळ येऊ नये यासाठी भाजपाने दमदार पावले टाकत काशी विश्वनाथ कॉरिडॉरचा भव्यदिव्य असा…
देशाच्या तिन्ही सेनादलांचे पहिले संरक्षणप्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ- सीडीएस) म्हणून सूत्रे हाती घेतलेले जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका…
पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल गेल्याच आठवडय़ात जाहीर झाला. त्यात महत्त्वपूर्ण बाब अधोरेखित झाली; ती म्हणजे जननदर स्थिरावण्याच्या दिशेने…
बांग्लादेशच्या निर्मितीस निमित्त ठरलेल्या १९७१ च्या भारत-पाक युद्धाला यंदा तब्बल ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
एकूण जगभरातील करोना रुग्णांपैकी दोनतृतीयांश संख्या ही युरोपातीलच असेल इतपत वाढ सातत्याने होते आहे.
नौदलाने स्टेल्थ गुणधर्म असलेला रंग वापरण्यास सुरुवात केली होती.
महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांच्या संख्येमध्ये या वेगवान शहरीकरणाच्या प्रक्रियेत समांतर वाढ होते आहे.