पीटीआय, जयपूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसने राजस्थानात सुरू केलेल्या कल्याणकारी योजना बंद करू नयेत, असे आपल्याला सांगून मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आधीच पराभव मान्य केला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. भाजप यापैकी कोणत्याही योजना बंद करणार नाही अशी हमी त्यांनी दिली.

 भाजपच्या वतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कुणालाही पुढे केले जाणार नाही असे स्पष्ट संकेत चित्तोडगड येथील जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी दिले. भाजप विधानसभेची निवडणूक पक्षाच्या ‘कमळ’ या चिन्हावर लढवेल असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल आदी नेते या वेळी हजर होते.

हेही वाचा>>>बिहार सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर; ओबीसी समाज ६३ टक्के, खुला प्रवर्ग १६ टक्के

भाजप राज्यात सत्तेवर आल्यास, काँग्रेस सरकारच्या योजना बंद केल्या जाणार नाहीत अशी हमी मोदी यांनी द्यावी, अशी मागणी गहलोत यांनी अलीकडेच केली होती.काँग्रेस सरकारची उलटगणती सुरू झाल्याचे गहलोत यांना माहीत आहे, असे मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accepting defeat by ashok gehlot narendra modi amy