Australia vs India, Final Kennington Oval, London: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ७ जूनपासून लंडनमध्ये हा सामना सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अंतिम संघ सादर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यावेळी मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. आता रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. मात्र, सलामीला कोण? हा प्रश्न कायम आहे.
आयसीसीने सांगितले की, भारताने १५ सदस्यीय संघात कोणताही बदल केलेला नाही. के.एल. राहुल दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. तर यशस्वी जैस्वालचा स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. जयस्वालने राजस्थान रॉयल्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने १४ सामन्यात ६२५ धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे टीम इंडियाने केएस भरत आणि इशान किशन
अंतिम सामन्यासाठी विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक खेळाडू सरावासाठी उतरले आहेत. कर्णधार रोहित शर्मा देखील ३० मे (मंगळवार) रोजी संघात सामील झाला. असं असलं तरी हा अंतिम सामना रोहित शर्मासाठी खूप खास असणार आहे. रोहितला त्याच्या कर्णधारपदाखाली यावेळी मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नसली तरी आता डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याची संधी त्याच्याकडे आहे.
रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या वाटेवर
अंतिम सामन्यात रोहित शर्माने आपल्या संघाला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून दिल्यास, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल. यासह, तो भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या निवडक कर्णधारांमध्ये सामील होईल. स्टार फलंदाज विराट कोहलीही त्याच्या नेतृत्वाखाली भारतासाठी एकही आयसीसी विजेतेपद मिळवू शकला नाही. म्हणजेच रोहितला कर्णधार म्हणून आयसीसी ट्रॉफी जिंकून विराट कोहलीला मागे टाकायची संधी असेल.
अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या फॉर्ममुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढू शकते. रोहितला आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी २०.७५च्या सरासरीने केवळ ३३२ धावा करता आल्या. आता रोहितला ते अपयश विसरून अंतिम सामन्यात फलंदाजीत दमदार खेळ दाखवायला हवा. रोहितच्या विपरीत, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे,
आयसीसी विजेतेपदाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षाही संपणार आहे. तसं पाहिलं तर भारतीय संघ दहा वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. शेवटच्या वेळी २०२३ मध्ये, टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाने अनेक वेळा सेमीफायनल किंवा फायनल गाठली, पण विजेतेपद मिळवता आले नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघ
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (व्हीसी), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर
स्टँडबाय खेळाडू: मिच मार्श, मॅथ्यू रेनशॉ
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल,
स्टँडबाय खेळाडू: यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final what happened if ipl is not won rohit now has a chance to create history kohli will also be left behind avw