-
एकूण ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा आता संपली आहे.
-
आज देशात झालेल्या सर्व सातही टप्प्यातील मतदानाची मतमोजणी होणार आहे.
-
आज दिवसभर ५४४ मतदासंघांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
-
या निवडणुकीत कोण विजय प्राप्त करणार? कोणत्या आघाडीला किती जागा मिळणार? असे अनेक प्रश्न आज सुटतील.
-
भाजपाप्रणित एनडीए आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होणार की इंडिया आघाडीला बहुमताचा आकडा मिळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
-
एनडीए आघाडी ४०० जागा जिंकेल असा दावा भाजपाने केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला आम्ही २९५ पेक्षा अधिक जागा जिंकत असून आम्ही सरकार बनवत आहोत असा प्रतिदावा इंडिया आघाडीच्याही नेत्यांनी केला आहे.
-
त्यामुळं आज कोणाला गुलाल उधळून विजयोसव साजरा करता येणार हे चित्र काही तासांत स्पष्ट होणार आहे.
-
आज होणाऱ्या मतमोजणीनंतर निकाल घोषित केले जातील. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची समाप्ती होईल.
-
दरम्यान, यंदाही भाजपा सत्तेत येणार असल्याचं एक्झिट पोल करणाऱ्या बहुतांश संस्थांनी अंदाजे सांगितलं आहे.
-
एनडीएनं ४०० पार असा नारा दिलेला असला तरी, तो मात्र या एक्झिट पोल्समध्ये खरा ठरताना दिसत नाहीय.
-
बहुतांश संस्थांनी एनडीएला ३५०+ तर इंडियाला १४१ ते १६१ जागांचा अंदाज वर्तवला आहे. माहितीसाठी लोकसभा निवडणुकीत एकूण ५४४ जागांसाठी मतदान झाले असून या सर्व जागांवर मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”