-    बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देत नव्या इतिहासाची नोंद केली आहे. 
-    दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. 
-    वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच मात दिली आहे. 
-    पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराटने किल्ला लढवला. 
-    त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले. 
-    पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने धडकी भरवणारा स्पेल टाकला आणि रोहित, राहुल आणि विराटला माघारी धाडले. 
-    प्रत्युत्तरात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी दमदार १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. 
-    रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 
-    भारत आणि पाकिस्तान या सामन्याचा थरार बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 
-    हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार उपस्थित होता. 
-    यावेळी त्याच्या बाजूला जय शहा, टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन ही स्टेडिअममध्ये मॅचसाठी बसलेला पाहायला मिळाला. 
-    तसेच बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा, मॉनी रॉय या अभिनेत्रींनीही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली. 
-    मात्र या सर्व सेलिब्रेटींमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. 
-    उर्वशीचे सामन्यादरम्यान भारतीय संघाला प्रोत्साहन देतानाचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. 
-    अनेक बॉलिवूड कलाकारांसह उर्वशीही भारताला चीअर करण्यासाठी दुबईच्या स्टेडिअमवर पोहोचली होती. 
 
  IND vs PAK: “ही मुंबई आणि IPL नाहीये”, तिलकला स्लेज करत होते पाकिस्तानी खेळाडू, जन्मभर विसरणार नाहीत असं उत्तर दिलं; VIDEO 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  