-
फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले आहे. 16 ते २७ मेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
-
यावेळी 76 व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये देश-विदेशातील प्रसिद्ध स्टार्स सहभागी होतात. जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुरस्कारात समावेश असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’चा इतिहास अनेक दशके जुना आहे.
-
१९४६ मध्ये पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर या फेस्टिव्हलची लोकप्रियता वाढतच गेली. २० सप्टेंबर १९४६ रोजी सुरू झालेल्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या ७६ वर्षांच्या इतिहासाचा भारतीय चित्रपट देखील एक भाग आहेत.
-
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्या भारतीय चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल जाणून घेऊया.
-
१९४६ मध्ये चेतन आनंदच्या ‘नीचा नगर’ या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळालेला हा पहिलाच चित्रपट होता.
-
बिमल रॉय यांच्या क्लासिक चित्रपट ‘दो बिघा जमीन’ला कान्स १९५३ मध्ये प्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
बालकलाकार नाझने १९५४ मध्ये ‘बूट पॉलिश’ या चित्रपटासाठी कान्स येथे स्पेशल डिस्टिंक्शन अवॉर्ड जिंकला.
-
सत्यजित रे यांच्या पहिल्या फीचर फिल्म ‘पाथेर पांचाली’ने १९९५ मध्ये सर्वोत्कृष्ट ह्युमन डॉक्यूमेन्ट्रीसाठी प्रतिष्ठित पाम डी’ओर जिंकला.
-
मृणाल सेनच्या ‘खर्जी’ या बंगाली चित्रपटाला १९८३ मध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला होता.
-
कान्स १९८८ मध्ये, मीरा नायरच्या मुंबई शहरातील अंडरक्लासवर आधारित ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटाने, कॅमेरा डी’ऑर जिंकला.
-
मिराली नारायण दिग्दर्शित ‘मारणा सिंहासनम्’ या मल्याळम चित्रपटाने कान्स १९९७ मध्ये प्रतिष्ठित कॅमेरा डी’ओर जिंकला.
-
इरफान खान स्टारर रितेश बत्राच्या ‘द लंचबॉक्स’ने कान्स २०१३ मध्ये क्रिटिक्स वीक व्ह्यूअर्स चॉइस अवॉर्ड जिंकला.
-
नीरज घवानच्या ‘मसान’ चित्रपटाला कान्स २०१५ मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स अवॉर्ड (FIPRESCI) देण्यात आला.
-
पायल कपाडियाच्या ‘अ नाइट ऑफ नोविंग नथिंग’ (A Night of Knowing Nothing) या माहितीपटाने कान्स २०२१ मध्ये L’Oeil d’Or म्हणजेच गोल्डन आय पुरस्कार जिंकला.
-
२०२२ मध्ये, दिग्दर्शक शौनक सेनच्या ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ या लघुपटाने गोल्डन आय अवॉर्ड जिंकला.

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?