-
मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे.
-
‘ठरलं तर मग’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘अबोली’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.
-
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मधील अद्वैत-कला आणि ‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ता सागरचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने दोन्ही जोड्यांसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये १५ वर्षांनंतर रणदिवे आणि विखे-पाटील कुटुंब एकत्र गुढी उभारणार आहेत.
-
सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सयाजीरावांनी एकत्र गुढी उभारण्यास सहमती दिली आहे.
-
पाडव्याच्या गोडव्याप्रमाणे दोन्ही कुटुंबांमधला नात्याचा गोडवाही वाढेल का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शालिनी आणि नित्या पहिल्यांदा एकमेकींसमोर येणार आहेत.
-
शालिनीच्या पापांचा घडा आता भरलाय.
-
त्यामुळे हा गुढीपाडवा शालिनीसाठी नवा धमाका घेऊन येणार आहे.
-
‘ठरलं तर मग’ आणि ‘अबोली’ मालिकेतही कलाकारांनी जल्लोषात गुढी उभारली आहे.
-
तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

“आम्ही तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू”, अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा; ‘या’ देशांचाही केला उल्लेख!