-
‘सैराट’ चित्रपटामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
‘सैराट’ प्रदर्शित होऊन आता ९ वर्षे उलटली आहेत तरीही, महाराष्ट्राच्या घराघरांत रिंकूला ‘आर्ची’ म्हणून ओळखलं जातं.
-
पावसाळा सुरू झाला की, अनेक कलाकार विविध निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जात असतात. रिंकू सुद्धा एका सुंदर ठिकाणी फिरायला गेली आहे.
-
पावसाळ्यात विविध गड-किल्ल्यांवर किंवा धबधब्यांजवळ अनेकजण ट्रेकिंगला जात असतात. मुंबई-पुण्यापासून जवळ असलेल्या पर्यटन स्थळांवर वीकेंडला प्रचंड गर्दी होते.
-
मात्र, रिंकूने तिच्या पावसाळी ट्रिपसाठी मुंबई-पुण्याची निवड न करता ती थेट दुसऱ्या राज्यात पोहोचली आहे. या निसर्गरम्य जागेचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रिंकूने तिच्या पावसाळी ट्रेकचे फोटो शेअर करत “प्रत्येक नवीन जागा तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाते…” असं कॅप्शन दिलं आहे.
-
रिंकूने शेअर केलेल्या एका फोटोंमध्ये “लोध वाटरफॉल हिडन जेम ऑफ झारखंड” असा फलक लावल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून अभिनेत्री झारखंड येथे फिरायला गेल्याचं स्पष्ट होत आहे.
-
लोध धबधब्याच्या परिसरात रिंकूने सुंदर फोटो काढले आहेत.
-
रिंकूने हे फोटो शेअर करताना शाहरुख खानच्या ‘जब तर है जान’ चित्रपटातील “जिया रे…” गाणं लावलं आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरु इन्स्टाग्राम )

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”