-
सोशल मीडियावर आपल्या रील्स आणि अभिनयामुळे लोकप्रिय असलेला रीलस्टार तन्मय पाटेकर याच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले.
-
तन्मयने पोस्टमध्ये लिहिले आहे की, वडील जागेवर असले तरी त्यांचा एक आशीर्वादाचा हात सतत पाठीशी असायचा. घरी नसताना आईसाठी ते एक मोठा आधार होते; मात्र आता सर्व काही देवाने हिरावून घेतल्यासारखे झाले आहे, असे तन्मयने म्हटले आहे.
-
तन्मयच्या आयुष्यात लवकरच ‘माझं लग्न’ हा आनंदाचा प्रसंग येणार होता. दुःखाच्या अनेक लाटांनंतर हे लग्न म्हणजे कुटुंबासाठी सुखाची लाट होती. मात्र, लग्नाच्या या महत्त्वाच्या क्षणी वडिलांचे सोबत नसणे हे खूप मोठे दुःख आहे. आपल्या नशिबी हे सुख नसावे, असे तन्मयने भावनिकपणे नमूद केले.
-
वडिलांचे अकाली जाणे हे तन्मयसाठी व्यक्तिगत दुःख असले तरी त्याने आईबद्दलची भावना व्यक्त केली आहे. आईच्या आयुष्यात आणि तिच्या कपाळी सौभाग्याचे सुख कायम राहील, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
-
वडिलांच्या निधनामुळे तन्मयवर मोठी जबाबदारी आली आहे. त्याने आपली आई, बहीण आणि आपले काम ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे. आजच्या दिवशी कामातून रजा घेऊन उद्यापासून पुन्हा कामासाठी तेवढाच तत्पर असेल, असे त्याने सांगितले आहे.
-
तन्मयने आपल्या पोस्टमध्ये ‘कलाकारीचा वडिलांचा वारसा मला पुढे घेऊन जायचंय’ अशी मोठी गोष्ट नमूद केली आहे. वडिलांचे छत्र हरपले असले तरी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तन्मय कामावर परतण्यास सज्ज झाला आहे.
-
वडिलांना कलेच्या क्षेत्रात फारसे नाव कमावता आले नाही, याची खंत त्याला होती. ते नेहमी म्हणायचे, “माझं जरी या क्षेत्रात जास्त नाव झालं नाही; पण माझा मुलगा ते स्वप्न नक्की पूर्ण करणार आणि माझ्या नजरेतून त्याचं यश बघणार.” तन्मय आता हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसणार आहे.
-
या कठीण काळात तन्मयने आपल्या चाहत्यांना भावनिक आवाहन केले आहे. “तुमची साथ आणि आशीर्वाद वडिलांच्या रूपाने कायम सोबत असू देत,” अशी विनंती त्याने चाहत्यांना केली आहे. या माध्यमातून त्याला वडिलांचे प्रेम आणि पाठिंबा कामातून मिळत राहील, अशी त्याची भावना आहे.
-
तन्मयने आपल्या पोस्टचा शेवट ‘ॐ शांती’ या शब्दांनी केला आहे. वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी त्याने ही पोस्ट लिहिली आहे. (सर्व फोटो सौजन्य : तन्मय पाटेकर/इन्स्टाग्राम)
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…