-
हिवाळ्यात पडणारे धुके, वातावरणात होणारे बदल, प्रदूषण या कारणांमुळे तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
-
वातावरणातील या बदलामुळे दमा किंवा श्वासाशी निगडित आजार असणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असते, इतकेच नाही तर अशा समस्या नसणाऱ्यांना देखील नव्याने काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
-
अशावेळी काही पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास ते हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी मदत करू शकतात, कोणते आहेत त्या भाज्या जाणून घ्या.
-
पालक : पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स आढळतात. तसेच पालक आयरनचे ही उत्तम स्रोत मानले जाते, त्यामुळे आयरनची कमतरता असणाऱ्या व्यक्तींना पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.
-
यासह आरोग्यासाठी फायदेशीर असणारे कॅल्शियम, विटॅमिन ए, विटॅमिन के यांसारखे मिनरल्स, विटामिन्स आढळतात. बद्धकोष्टतेच्या समस्येवरही पालक फायदेशीर मानले जाते.
-
चाकवत : चाकवताची भाजी चविष्ट आणि अत्यंत पौष्टिक असते.
-
या भाजीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन यांसह ८ प्रकारचे विटामिन आढळतात. त्यामुळे चाकवताची भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
-
गाजर : हिवाळ्यात सगळीकडे गाजर मोठया प्रमाणात उपलब्ध होतात. गाजरामध्ये विटामिन ए, पोटॅशियम, आयरन असे पोषकतत्त्व आढळतात. त्यामुळे यांचा रोजच्या डाएटमध्ये समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
-
तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही गाजर फायदेशीर मानले जाते. यामध्ये बीटा कॅरोटीन आढळते, जे डोळ्यांच्या रेटीनासाठी फायदेशीर ठरते तसेच त्यामुळे सुर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते.
-
बीट : बीटामध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात, तसेच हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
-
यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर यांसारखे शरीराला आवश्यक असणारे पोषकतत्त्व आढळतात.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.) (फोटो सौजन्य : Freepik)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक