-
बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रदुषित वातावरणाचा आपल्या केसांवर वाईट परिणाम होत असतो. अशाने केस गळणे, अकाली केस पांढरे होणे अशा अनेक समस्या जाणवतात. यात अनेकांना सध्या अकाली केस पांढरे होण्याची समस्या जाणवत आहेत.(photo – freepik)
-
ज्यावर उपाय म्हणून अनेकदा आवळा, भृंगराज पावडर, खोबरेल तेलासह अनेक उपाय सुचवतात. पण यामुळे अकाली पांढरे किंवा राखाडी होण्याची समस्या दूर होते का? यावर डॉक्टरांचे काय मत आहे जाणून घेऊ…(photo – freepik)
-
‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना खारमधील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील त्वचारोग तज्ज्ञ आणि ट्रायकोलॉजिस्ट डॉ. वंदना पंजाबी यांनी अकाली केस पांढरे न होण्यासाठी आवळा, तांदळाचे पाणी किंवा रोझेमेरी, खोबरेल तेल, भृंगराज तेल मिक्स करुन बनवलेला एक हेअर पॅक खरचं फायदेशीर ठरतो याविषयावर सविस्तर माहिती दिली आहे (photo – freepik)
-
दरम्यान डॉ. वंदना पंजाबी म्हणाल्या की, आवळा, भृंगराज, खोबरेल तेल, तांदळाचे पाणी किंवा रोझमेरीपासून बनवलेला हेअर पॅक केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कारण केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यात यातील प्रत्येक घटकाची मदत होते. (photo – freepik)
-
याचविषयावर द अॅस्थेटिक क्लिनिक्सच्या स्किन स्पेशालिस्ट आणि कॉस्मेटिक स्किन सर्जन डॉ. रिंकी कपूर म्हणाल्या की, भृंगराज याला आयुर्वेदिक औषधांचा राजा म्हणून ओळखले जाते. जे केसाच्या वाढ, अकाली केस पांढरे होण्यापासून रोखणे, केसांना मुळांपासून पोषण देणे याशिवाय टाळूतील रक्तप्रवाहाचे कार्य सुधारण्याचे काम करते. (photo – freepik)
-
आवळ्यातील व्हिटॅमिन सी जे कोलेजन वाढीस प्रोत्साहन देते तसेच केस मजबूत करते. यातील अँटिऑक्सिटंड गुणधर्म तणाव कमी करत अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर ठेवते. (photo – freepik)
-
रोझमेरी तेलाचा वापर अनेकदा रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, केसांच्या मुळांचे पोषण वाढवण्यासाठी आणि केस पातळ होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म मुक्त रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करू शकतात.(photo – freepik)
-
तांदळाच्या पाण्यात केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारे अनेक नैसर्गिक घटक आहेत. त्यातील इनोसिटॉल, कर्बोदके खराब झालेले केस मजबूत आणि दुरुस्त करण्यास मदत करतात. तांदळाच्या पाण्यातील अॅमिनो अॅसिड केस आणि टाळूचे पोषण करू शकतात. (photo – freepik)
-
खोबरेल तेल लोकप्रिय नॅचरल मॉइश्चरायझर आहे; जे केसांमधील प्रथिने कमी होण्यास प्रतिबंध करते, केस मजबूत आणि निरोगी ठेवते. त्यामुळे पर्यावरणीय घटकांमुळे होणारे नुकसानही कमी होऊ शकते, असे डॉ. कपूर म्हणाल्या. (photo – freepik)
-
डॉ. कपूर म्हणाल्या की, वरील हेअर पॅक नियमितपणे वापरल्याने केसांना योग्य पोषण मिळू शकते, केस मजबूत होतात आणि अकाली पांढरे होण्याची शक्यता कमी होत; ज्यामुळे केस चमकदार आणि दाट होतात. (photo – freepik)
-
डॉ. पंजाबी यांच्या मते, वैज्ञानिक पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, केस अकाली पांढरे होण्यामागील प्राथमिक कारण प्रामुख्याने आनुवंशिक असले तरी इतर परिस्थितीही यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे कोणतेही तेल किंवा हेअर पॅक वापरण्यापूर्वी हेअर एक्स्पर्ट किंवा स्किन स्पेशलिस्टचा सल्ला घ्या. त्यानंतर केसांवर विविध उपाय ट्राय करा.(photo – freepik)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”