-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करुन इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो.
-
आता सूर्यदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. तर एप्रिल महिन्यात सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. जिथे देवगुरु आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे मेष राशीत देवगुरु आणि सूर्यदेवाची युती होणार आहे.
-
ही युती तब्बल बारा वर्षांनंतर होणार आहे. या युतीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
-
परंतु अशा तीन राशी आहेत, ज्यांना या युतीमुळे अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे, पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
गुरु आणि सूर्यदेवाच्या युतीमुळे धनु राशीच्या लोकांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
-
गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना अतिशय शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. या काळात नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे.
-
गुरु आणि सूर्यदेवाची युती मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच तुमची पगारवाढ होऊ शकते. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल