/
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या गुरू वृषभ राशीत विराजमान असून शुक्र डिसेंबर महिन्यामध्ये मकर राशीमध्ये विराजमान असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा दोन ग्रहांची एकाच राशीत युतीदेखील निर्माण होते. ज्यामुळे काही शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, २० डिसेंबरपासून सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी शुक्र आणि गुरू एकमेकांपासून १२० डिग्रीवर आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. या राजयोगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठीदेखील नवपंचम राजयोग अनेक चांगले परिणाम घेऊन येणारा ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
नवपंचम राजयोग कन्या राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अनेकदा कन्या राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशींच्या व्यक्तींसाठी नवपंचम राजयोग अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)