-
वाढत्या वयासह आपल्या शरीरातील अवयवदेखील आरोग्याकडे सर्वाधिक लक्ष देण्याचे संकेत देऊ लागतात. अशावेळी आपल्या आहारात नैसर्गिक, पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पर्यायांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
भारतातील अनेक घरांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी भेंडीची भाजी बनवली जाते. बरेचजण ही भाजी आवडीने खातात. भेंडीची भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते, पण भाजीव्यतिरिक्त भेंडीचे पाणीही आरोग्यासाठी खूप लाभदायी मानले जाते. (फोटो सौजन्य: Freepik) -
भेंडी पाण्यात भिजवून बनवलेले एक साधे मिश्रण, ३० आणि ४० वय असणाऱ्यांसाठी आश्चर्यकारकपणे गुणकारी मानले जात आहे. असे हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील केअर हॉस्पिटल्समधील क्लिनिकल डायटिशियन सुषमा म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
भेंडीमध्ये अ, क आणि के सारखे आवश्यक जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि फोलेटसारखी खनिजे भरपूर असतात. ३० ते ४० वयाच्या आसपास असलेल्यांना शरीर वृद्धत्वाच्या प्रक्रियेशी जुळवून घेत असताना हे आणखी महत्त्वाचे बनतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
भेंडीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉलसह अँटीऑक्सिडंट घटक असल्याने ते फ्री रॅडिकल्सशी लढते. हे जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढण्यास मदत करते, ज्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो आणि वयानुसार एकूणच आरोग्य सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भेंडी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात भूमिका बजावू शकते. हे विशेषतः ४० वर्षांच्या लोकांसाठी महत्त्वाचे आहे, कारण वयानुसार टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य: Freepik) -
भेंडीमधील विरघळणारे फायबर वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो, जो वयानुसार वाढत जाणारा चिंतेचा विषय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
भेंडीतील उच्च फायबर सामग्री निरोगी पचनास प्रोत्साहन देते आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते, ही एक सामान्य समस्या आहे, कारण वयानुसार आपला चयापचय दर मंदावतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
भेंडीचे पाणी चांगले हायड्रेशन करण्यास मदत करते, जे त्वचेची लवचिकता राखण्यासाठी आणि कोरडेपणा रोखण्यासाठी आवश्यक आहे.
(फोटो सौजन्य: Freepik)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा