-
करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले असून सध्या काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आहे. तसंच तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे लॉकडाउन उठवला जाणार की वाढणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी दोन्ही ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लॉकडाउनसंबंधी विधान केलं आहे.
-
रत्नागिरीत महाराष्ट्रात करोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “करोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण करोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला”.
-
आज मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहन धोरणाबाबत आढावा घेतली
-
संग्रहीत
सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला -
सिंधुदूर्गमध्येही उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनवर भाष्य करताना, "लॉकडाउन कधीही उठू शकतो पण आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे," असं सांगितलं.
-
"जेवढी रुग्णवाढ किंवा रुग्णसंख्या आहे त्यातील ७० टक्के लोकांना लक्षणं नाहीत. तरीदेखील बेड कमी पडत आहेत. ती टक्केवारी वाढली तर काय होईल याचा विचार करा," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
-
"लॉकडाउन कधीही उठू शकतो पण आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेनेही लस मिळाल्यानंतरही मास्क घालणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. ही बंधनं पाळणं अत्यावश्याक आहे," असंही ते म्हणाले.
-
(Photos: File/CMO Twitter)

Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”