-
मराठा आरक्षणासाठी मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी गुरुवारी (१४ सप्टेंबर) १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते फळांचे रस घेत उपोषण सोडलं.
-
यानंतर बोलताना मनोज जरांगे यांनी मोठी विधानं केली. ते नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…
-
लईच अवघड खेळ आहे. रावसाहेब दानवेंनी रात्री एक चिट्ठी काढली. यानंतर पत्रकारांनी ती कशाची चिट्ठी आहे, कशाची चिट्ठी आहे असं विचारून मला बेजार करून टाकलं – मनोज जरांगे
-
हे मला रात्रीची झोपही येऊ देईना. रात्री रग ओढायला लागले. कोण नेता होता असं विचारलं जात होतं. मात्र, मी सांगून टाकतो की, मी तसले धंदेच करत नाही – मनोज जरांगे
-
मी खानदानी घरात जन्माला आलो आहे. मी खानदानी मराठा आहे – मनोज जरांगे
-
मी कुणाच्या सांगण्यावरून आंदोलन करत नाही. मी तशी औलाद नाही, माझं तसलं रक्त नाही – मनोज जरांगे
-
त्या चिट्ठीत स्पष्टपणे आमच्या मागण्यांवर चर्चा केलेली होती – मनोज जरांगे
-
रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांनी मला ती चर्चा अशी आहे असं सांगत ती चिट्ठी दिली. मी माझ्या मराठा समाजासमोर पारदर्शक आहे – मनोज जरांगे
-
माझं वाटोळं झालं, राखरांगोळी झाली, तरी मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही – मनोज जरांगे
-
तो कोण आहे त्याने लक्षात ठेवावं की, मी मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही, पण तो जर उघडा झाला, तर राज्यात त्याचा एकही पदाधिकारी राहणार नाही – मनोज जरांगे
-
त्यांनी मराठा समाजाच्या पोरांशी घात करू नये – मनोज जरांगे
-
आमच्या तोंडात आरक्षणाचा घास आला आहे. त्यांनी त्यांची वायफळ बडबड करू नये – मनोज जरांगे
-
आमच्या मराठ्यांच्या पाच पिढींमधील लेकरांचं वाटोळं झालं आहे. त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी माझा घात करू नये – मनोज जरांगे
-
आम्ही तसले धंदे करत नाही. जे असेल ते पारदर्शकपणे समाजाच्या समोर काम करतो – मनोज जरांगे
-
आत्ताही सांगतो की, आम्ही सरकारला दिलेल्या वेळेवर ठाम आहोत. आम्ही मोठ्या मनाने १० दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे – मनोज जरांगे
-
आम्हाला इतर कशाचीही गरज नाही,आम्हाला आरक्षण द्या – मनोज जरांगे
-
आम्ही असे चिट्ठीफिट्ठीचे धंदे करत नाही – मनोज जरांगे
-
मी उभ्या आयुष्याची राखरांगोळी केली – मनोज जरांगे
-
मला माझ्या रानाचा बांध कुठंही हेही माहिती नाही – मनोज जरांगे
-
मी इतकं रात्रंदिवस समाजासाठी काम करतो – मनोज जरांगे
-
योगायोगाने माझा बाप इथं आला आहे. मी माझं मोठेपण सांगत नाही, माझा बाप कष्ट करतो आणि आम्हाला खाऊ घालतो – मनोज जरांगे
-
बापाच्या कष्टाचं खाऊन हा पठ्ठ्या समाजाचं काम करतो – मनोज जरांगे
-
एकाने जरी मला म्हटलं की, तुला फिरायला एक रुपया दिला आहे, तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन – मनोज जरांगे
-
हे असले चिट्ठीफिट्ठीचे कारण आम्हाला सांगायचे नाही – मनोज जरांगे
-
ते आम्हाला सहन होणार नाही – मनोज जरांगे
-
जे बेगडी लोकं असतात त्यांना हे सहन होईल, मी सहन करू शकत नाही. कारण माझं उभं खानदान कष्टात गेलं आहे – मनोज जरांगे
-
सर्व छायाचित्रे – संग्रहित/सोशल मीडिया

चंद्रशेखर बावनकुळे समोर येताच उद्धव ठाकरेंनी अशी कोपरखळी मारली की सगळ्यांनाच हसू अनावर