-
मुंबई ते दिल्ली हा प्रवास आता फक्त १२ तासांत पूर्ण करणारी ‘टॅल्गो’ ही भारतातील सर्वाधिक वेगवान रेल्वे मंगळवारी सकाळी ११.३५ च्या सुमारास मुंबई सेन्ट्रल येथे दाखल झाली. (छाया- निर्मल हरिंद्रन)
-
ताशी १५० किमी तर सरासरी १२५ किमी वेग असलेली ही टॅल्गो मुंबई ते दिल्ली हे १३४८ किमीचे अंतर फक्त १२ तासांत पूर्ण करेल. (छाया- दिलीप कागडा )

राजधानी एक्स्प्रेसला हेच अंतर कापण्यासाठी सुमारे १६ तास लागतात. म्हणूनच भारतातील वेगवान रेल्वेचा मान टॅल्गोने मिळवला आहे. (छाया- निर्मल हरिंद्रन) -
टॅल्गोमध्ये विविध प्रकारचे सेंसर लावण्यात आले असून या मार्गावरील सर्व विभागांना या वेगवान गाडीच्या चाचणीचा लेखाजोखा करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. (छाया- निर्मल हरिंद्रन)
-
यासाठी आर.डी.एस.ओ.च्या अभियंत्यांचे पथक ठेवण्यात येणार आहे. तसेच स्पेनमधूनही अभियंत्यांचा गट यासाठी उपस्थित राहणार आहेत. (छाया- निर्मल हरिंद्रन)

मे महिन्यात अशा प्रकारची चाचणी उत्तर प्रदेशमधील बरेली ते मोरादाबाद आणि पलवल ते मथुरा या मार्गावर करण्यात आली. त्यामुळे चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा रेल्वेप्रवास अधिक जलद होण्यास मदत होईल. (छाया- दिलीप कागडा) -
ही ट्रेन राजधानीपेक्षाही तीन तास उशिराने निघूनही मुंबईत वेळेवर दाखल झाली . (छाया- अमित चर्कवर्ती)
-
दिल्ली ते मुंबई या प्रवासात या ट्रेनला अनेक स्थानकांवर थांबाही देण्यात आला. (छाया- निर्मल हरिंद्रन)

२७ मार्च २0१६ रोजी समुद्रमार्गे ही ट्रेन भारतात दाखल झाली संपूर्ण वातानुकूलित असलेल्या ट्रेनमुळे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत. (छाया- निर्मल हरिंद्रन)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ