-
केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. नागरिकांचे पुनर्वसन सुरू झाले आहे.
-
दोन दिवसांत पावसाने थोडा दिलासा दिला असून अर्नाकुलम, त्रिचूर, पथानथिट्टा, अलापुझा व कोल्लम जिल्ह्यात पुराने फार वाईट स्थिती झाली आहे. पाठ्यपुस्तक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं वाळवताना त्रिचूरमधील हे चित्र..
-
८ ऑगस्टपासून केरळमध्ये पुराचे थैमान सुरू असून वीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. जनजीवन हळूहळू पूर्ववत होण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
१०.७८ लाख लोक विस्थापित झाले असून त्यात २.१२ लाख महिला व १ लाख मुले आहेत. एकूण ३२०० मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
-
पुराचे पाणी ओसरू लागल्याने मदत छावण्यांमधून नागरिक घरी परतण्याची तयारी करू लागले आहेत.
-
पुराचं पाणी ओसरल्यानंतर घराची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी कुटुंबातील इतर व्यक्ती गेले असता मदत छावण्यांमध्ये थांबलेले वृद्ध..

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल