-
भारताने केवळ २९ चेंडूत जपानला हरवलं (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय अगदी सार्थ ठरवला. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अवघ्या २९ चेंडूत विजय मिळवला. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
प्रथम फलंदाजी करताना जपानचा संघ अवघ्या ४१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार केले. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
भारताच्या रवि बिश्नोई, कार्तिक त्यागी, आकाश सिंग आणि विद्याधर पाटील या चौघांच्या तोफखान्यापुढे जपानचा डाव ४१ धावांत आटोपला. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
जपानच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. निम्मा संघ तर शून्यावर बाद झाला. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
शू नोगुची आणि केन्तु डोबेल या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी ७ धावा केल्या. भारताकडून रवि बिश्नोईने ४, कार्तिक त्यागीने ३, आकाश सिंगने २ आणि विद्याधर पाटीलने १ बळी टिपला. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने धमाकेदार खेळी केली. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
त्याने १८ चेंडूत नाबाद २९ धावा कुटल्या. त्या खेळीत यशस्वीने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
त्याला कुमार कुशाग्र याने चांगली साथ दिली. कुमारने ११ चेंडूच नाबाद १३ धावा केल्या. त्यात २ चौकार होते. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
जपानविरूद्धच्या सामन्यातील विजयामुळे भारताने या विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)
-
जपानविरूद्धच्या सामन्यातील विजयामुळे भारताने या विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. (फोटो सौजन्य – ICC वेबसाईट)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”