-
टी २० विश्वचषक २०२२ स्पर्धेला १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरूवात होत आहे.
-
भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत आहे.
-
त्याआधी भारत दोन सराव सामनेही खेळणार आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
-
२००७ च्या विश्वचषक जिंकल्यानंतर भारताला आत्तापर्यंत एकही विजेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे यंदा रोहितवर मोठी जबाबदारी आहे.
-
आत्तापर्यंत टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या जर्सीचा रंग आणि रचना अनेकदा बदलली आहे.
-
२००७ पासून आत्तापर्यंत भारताच्या जर्सीमध्ये किती वेळा आणि कोणकोणता बदल झाला आहे. चला जाणून घेऊयात.
-
पहिला T20 विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला होता. २००७ मध्ये टीम इंडियाची एकदिवसीय जर्सी फारशी बदलली नव्हती.
-
त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे होते. दक्षिण अफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत भारताला विजेतपद मिळाले होते.
-
२००९ मध्ये भारतीय संघाची विश्वचषक जर्सी खूप बदलली. नेव्ही ब्लू जर्सीमध्ये विश्वचषक खेळण्यासाठी पोहोचलेला.
-
मात्र, भारतीय संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
-
२०१० मध्येच टी-२० विश्वचषक स्पर्धेअगोदरही भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगात थोडा बदल झाला होता.
-
मात्र, या वर्षीही संघ विशेष कामगिरी करु शकला नाही. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इंग्लंडने विजेतेपद पटकावले.
-
२०१२ मध्ये आशिया खंडात पहिल्यांदाच टी २० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीलंकेने यजमानपद भूषवले.
-
१२ संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाची जर्सी जुन्या शैलीत बनवली गेली होती. यावेळीही भारतीय संघाची कामगिरी निराशजनकच राहिली. वेस्ट इंडिजने श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले.
-
२०१४ मध्येही टी २० विश्वचषक आशियामध्ये झाला आणि यावेळी बांगलादेशला यजमानपद मिळाले.
-
त्या वर्षी भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, अंतिम फेरीत भारताचा पराभव करत श्रीलंकेने विजेतेपत पटकावले.
-
२०१६ च्या टी २० विश्वचषक स्पर्धत धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली सुरुवात केली होती. यावेळी संघाची जर्सी वनडेच्या जर्सीपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती.
-
२०१६ च्या टी-२० विश्वचषकात आपल्या धडक कामगिरीमुळे भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता. मात्र, उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला.
-
यावर्षी २०२२ साली खेळल्या जाणाऱ्या टी २० वर्ल्डकप पूर्वी भारताने नवीन जर्सी लाँच केली आहे. जर्सीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल