-
महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी, नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नियम न पाळणाऱ्या नागरिकांना मास्क व फुलांचे वाटप केले. ( सर्व छायाचित्र : नरेंद्र वास्कर )
-
करोनाविषयक जनजागृतीसाठी तुर्भे विभाग कार्यालयाच्या वतीने हा पुढाकार घेण्यात आला.
-
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने मास्कचा वापर करावा, असा यातून संदेश देण्यात आला.
-
तसेच, गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी करत, नागरिकांचे कान टोचल्याचे दिसून आले.
-
महा पालिकेचे साफ सफाई कामगार टाळेबंदीच्या काळातही गेली सहा महिने आपले कर्तव्य बजावत होते. गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाला शहरात सुरुवात करण्यात आली असून शहर प्रथम क्रमाकावर येणयासाठी त्यांच्यावरच सर्व मदार असणार आहे.
-
गुलाबाचे फूल देत करोना नियंत्रणासाठी नियम पाळा असे आवाहन केले. विविध दुकान मालकांनाही याबाबत नियमावली पाळण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
-
लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही गर्दी करणार, त्या त्या ठिकाणी करोनाचा धमाका होणार, तिसरे महायुद्ध करोनामुळे, घरात थांबा इतिहास घडेल, बाहेर जाल, इतिहास व्हाल, भीड मत ‘करो’ना! आशा विविध आशयाचे फलक घेत सफाई कामगारांनी सानपाडा येथील मोराज सर्कल, वाशीतील आरेंजा कॉर्नर, अन्नपूर्णा चौक, माथाडी चौक, जलाराम चौक या गर्दीच्या ठिकाणी मानवी साखळी करीत जनजागृती केली.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल