-
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला, हातातोंडाशी आलेलं पिक पावसामुळे वाया गेल्यामुळे राज्यातील बळीराजावर संकट कोसळलं आहे.
-
मराठवाडा, कोकण, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला. तसेच ठाणे जिल्ह्यातील भातशेती देखील पावसामुळे उध्वस्त झाली आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – डॉ.श्रीकांत शिंदे फेसबूक अकाऊंट)
-
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदार संघातील अंबरनाथ तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
-
अंबरनाथ तालुक्यात मलंगवाडी, कुशीवली, आंबे, ढोके, खरड, मंगरुळ, नेवाळी पाडा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात धुमाकूळ घातलेल्या परतीच्या पावसाचा फटका या भागातील शेतकऱ्यांनाही बसला.
-
या पाहणी दौऱ्यादरम्यान ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व इतर अधिकारीही सोबत होते. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा, पिकांचे पंचनामे करुन त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या सूचना यावेळी डॉ. शिंदे यांनी केल्या.
-
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन दिलं.

“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक