-
आसामच्या कामरूप जिल्ह्यात आलेल्या भीषण महापुराने स्थानिक रहिवाशांच्या घरांना वेढा टाकला असून शेती पीकेही पाण्याखाली गेली आहेत. २९ जिल्ह्यांमधील १६.५० लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. (पीटीआय फोटो)
-
आसाममधील महापुराचे हे ड्रोन कॅमेराने टिपलेले छायाचित्र आहे. ब्रह्मपुत्रा, दिगारू आणि कोलोंग सारख्या प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. (पीटीआय फोटो)
-
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटीमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करून बाधितांना संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. (पीटीआय फोटो)
-
आसामच्या मालीगाव परिसरातील भूभाग मोठ्या प्रमाणात जलमय झाला असून, पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. (पीटीआय फोटो)
-
आसामच्या बचाव पथकांचे मदतीचे प्रयत्न सुरू आहेत, अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी ही पथके अथक परिश्रम करत आहेत. (पीटीआय फोटो)
-
ईशान्य भारतात आलेल्या महापूर आणि भूस्खलनामुळे गेल्या २४ तासात किमान आठ लोकांचा मृत्यू झाला आहे, मे पासून मृतांची संख्या ४६ वर पोहोचली आहे. (पीटीआय फोटो)
-
भूस्खलन आणि पुराचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे, तीन लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. (पीटीआय फोटो)
-
IMD ने पुढील तीन दिवस आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. (पीटीआय फोटो)
-
आसाममधील २८ जिल्ह्यांतील ११.३४ लाख लोक भीषण पूरस्थितीमुळे प्रभावित झाले असून काल (४जुलै) फक्त एका दिवसात ६.४४ लाख लोक प्रभावित झाले आहेत. (पीटीआय फोटो)
-
महापूर, भूस्खलन आणि मुसळधार पाऊस या तिहेरी संकटांशी एकाचवेळी स्थानिकांना लढावे लागत आहे. नागरिकांकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बोटींचा वापर सुरु आहे. (पीटीआय फोटो)
-
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पुराच्या पाण्याने ११ वन्य प्राण्यांचा बळी घेतला आहे तर आणखी अडकलेल्या वन्यजीवांचे प्राण वाचविण्यासाठी बचावपथके प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. (पीटीआय फोटो)
-
आतापर्यंत तब्बल ६५ प्राण्यांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश मिळाले आहे तर अनेकांचे जीव अजूनही धोक्यात आहेत. (पीटीआय फोटो) हेही पाहा- Hathras Stampede: पीडित कुटुंबीयांचा राहुल गांधींसमोर एकच आक्रोश! पाहा फोटो…

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल