-
छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येण्याची घोषणा २०१४ मध्ये करण्यात आली होती. (फोटो-प्रातिनिधिक छायाचित्र)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ डिसेंबर २०१६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन केले होते.(फोटो-CMO MaharashtraX)
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाचे कार्यादेश ऑक्टोबर २०१८ मध्ये देण्यात आले. मात्र, २०१९ मध्ये न्यायालयाने कामास स्थगिती दिली. ही स्थगिती आजही कायम आहे.(फोटो-प्रातिनिधिक छायाचित्र)
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एकही वीट अद्याप रचली गेलेली नाही. न्यायालयाच्या पुढील निर्णयावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.(फोटो-प्रातिनिधिक छायाचित्र)
-
मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार असून शिवस्मारकाची उंची १९२ मीटरऐवजी २१० मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णयही झाला होता.(फोटो-CMO Maharashtra X)
-
मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकासाठी पहिल्या टप्प्यात २३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (फोटो-CMO Maharashtra X)
-
अरबी समुद्रातील शिवस्मारकाजवळ पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती देणारे दालन, पुस्तक प्रदर्शन, वस्तूसंग्रहालय असणार आहेत.(फोटो-CMO Maharashtra X)
-
आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी अरबी समुद्रात जाऊन स्मारक स्थळाची पाहणी करत सरकारवर टीका केली.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अद्याप न झाल्यामुळे आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
“केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार आहे, मग स्मारक का झालं नाही?”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला केला आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)