-
महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीमत्वांपैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे रोहित पवार.
-
शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून ते कायमच चर्चेत असतात.
-
महाविकासआघाडीची सत्ता असताना आणि आता सत्ता गेल्यानंतरही ते सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते.
-
रोहित पवारांनी नुकतीच ‘मराठी किडा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीत रोहित पवारांना वैयक्तिक व राजकीय प्रश्नही विचारण्यात आले.
-
या मुलाखतीत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
-
यावेळी रोहित पवारांना कर्जत-जामखेड मतदारसंघाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
-
‘बारामतीत इतकं मोठं प्रस्थ असताना कर्जत जामखेडमधून निवडणूक का लढवली?’ असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.
-
त्यावर त्यांनी फार स्पष्टपणे उत्तर दिले.
-
“मी तिथे गेलो आणि मला तिकडची लोकं आवडली.”
-
“त्याबरोबरच लोकांचीही इच्छा होती.”
-
“त्या ठिकाणी काहीच विकास झाला नव्हता.”
-
“तिथे गेल्यानंतर मी विकास करु शकतो, हा विचार ठेवून मी निवडणूक लढलो.”
-
“मी तिकडे जिंकेन की हरेन याचा विचारच केला नाही.”
-
एक मोठा नेता माझ्याविरोधात उभा असतानाही लोकांनी छोट्या कार्यकर्त्याला, नवीन कार्यकर्त्याला निवडून दिलं, त्यातूनच समजत की तिकडची लोक ही मोठ्या मनाची आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.
-
दरम्यान रोहित पवारांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला होता. राम शिंदे यांना हरवून रोहित पवार पहिल्यांदा आमदार झाले.
-
(सर्व फोटो – रोहित पवार/ फेसबुक)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?