राज्यातील करोनाची दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या परिस्थितीवरून तसेच, निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या मुद्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार गोंधळलेलं व लेचपेचं असल्यानेच कोणताही निर्णय होत नाही, असं त्यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर पुण्यात बोलून दाखवलं.