२००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. याबाबत ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले, की तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी आमच्याकडे ज्या नेत्यांचे पर्याय होते, त्यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री केलं असतं तर आमचा पक्ष फुटण्याची भीती होती. त्यावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष फुटल्याचं म्हटलं आहे.