लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरुवात केली. त्याआधी गणेशोत्सव हा सण घरगुती स्वरुपामध्ये साजरा केला जात असे. पारतंत्र्यामध्ये लोकांनी एकत्र यावे यासाठी टिळकांनी ही प्रथा सुरु केली. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या महानगरांसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. मुंबईमधील चाकरमनी खास गणपतीसाठी कोकण गाठतात. करोना काळामध्ये गणेशोत्सवावर काही प्रमाणामध्ये बंधने आल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. तेव्हा लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते. काही दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi) दिवशी घरी जायला निघतात. गणेशोत्सवामध्ये एकूणच चैतन्याचा वातावरण असते. २०२३ मध्ये १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.Read More
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) मूर्ती विसर्जनाबाबत प्रसिद्ध केलेल्या २०२० सालच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना ठाणेस्थित श्रीगणेश मूर्तीकार उत्कर्ष संस्थेने उच्च…
गणेशोत्सवाच्या काळात शहरभर ध्वनिप्रदूषण झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवसाच्या ध्वनिप्रदूषणाची नोंद घेण्यात आली नव्हती.
गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी १३७ सार्वजनिक मंडळांवर आणि प्रखर लेझर प्रकाश किरणांचा वापर केल्याप्रकरणी १० मंडळांवर कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सव कालावधीमध्ये कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ९७ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले होते.