
नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यात आता महापूर, दरडी कोसळण्याच्या घटनाही नेमेचि घडणाऱ्याच आहेत.
गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यात आता महापूर, दरडी कोसळण्याच्या घटनाही नेमेचि घडणाऱ्याच आहेत.
गेल्या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचे उद्घाटन केले, याअंतर्गत प्रत्येक भारतीयास आधार क्रमांकाप्रमाणेच खास वैयक्तिक…
समाजमाध्यमावरच्या हमामखान्यात फेसबुक आणि गूगल दोघेही उघडेच आहेत, हे पुरते स्पष्ट झाले.
पंजाबमध्ये निवडणुकीचे वारे जोरदार सक्रिय झाले असून त्यात जवळच्याच नवी दिल्लीत सत्तेत असलेल्या ‘आप’ या राजकीय पक्षानेही विशेष रस घेतला…
मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सत्तेत आल्यानंतर गेली सातवर्षे निवडणुकांशिवाय-देखील ध्येय-धोरणांपासून सर्वत्र केवळ राजकारणाचाच विचार यशस्वीपणे करताना दिसतो आहे.
गेल्या शुक्रवारी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी भारताने तब्बल १ कोटी सात लाख नागरिकांचे लसीकरण करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला.
कोविड-१९ ही केवळ महासाथ नाही तर आपल्या सर्वासाठीच तो अनेक अर्थानी एक वेगळा साक्षात्कार होता.
स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव १९९७ साली साजरा झाला त्या वेळेस वेगळेच चैतन्य होते. जागतिकीकरणाची फळे दिसायला सुरुवात झाली होती.
दोन वर्षांमध्ये काश्मीरच्या स्थितीमध्ये कोणताही फारसा महत्त्वपूर्ण असा बदल झालेला नाही.
राज्यातील करोनासंबंधित र्निबध शिथिल करण्याची वेळ टळून गेली असे होऊ द्यायचे नसेल तर त्यासाठी हीच वेळ आहे!