-
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण केल्यामुळे चर्चेत आलेल्या मनोज जरांगेंची पुढची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
-
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात बीड आणि जालना या ठिकाणी आज मतदान पार पडतं आहे.
-
४ जूननंतर मनोज जरांगे सभा घेऊन ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
-
काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.
-
काय म्हणाले मनोज जरांगे?
” मी ८ जून रोजी नारायणगड या ठिकाणी भव्य सभा घेतो आहे. १५ मेच्या दिवशी मी तिथल्या जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर, राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांना या विराटसभेसाठी आवाहन करण्यात येईल. -
“या सभेला सहा कोटी मराठा बांधव या ठिकाणी येतील. १५ मेच्या पाहणीनंतर सभेविषयी मी अंतिम निर्णय घेणार आहे.”
-
तसंच,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना “चंद्रकांत पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
-
चंद्रकांत पाटील यांच्याबाबत काय म्हणाले मनोज जरांगे?
चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं आहे? त्यांना काय कळतं. फक्त ‘तेरे नाम; भांग पाडून हिंडत असतात, स्वतःची ३७ मतं तरी त्यांना पडतात का?, असं म्हणत मनोज जरांगेंनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”