-
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांची लोकसभा निवडणुकीत एकमेकाविरोधात लढत झाली आहे.
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल आणि स्मृती यांनी अमेठीमध्ये आमनेसामने मुकाबला केला.
-
त्या मुकाबल्यात राहुल यांना धक्का देत स्मृती इराणी यांनी विजय प्राप्त केला. (Photo- ANI)
-
त्यानंतर यावर्षी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी त्यांचा मतदारसंघ बदलून रायबरेली येथून उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
रायबरेली हा उत्तरप्रदेशमधील एक मतदारसंघ आहे. उत्तरप्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेस यांची युती असून तिथे राहुल यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे.
-
तर दुसर्या बाजूला अमेठी येथून मागच्या टर्मला विजयी झालेल्या स्मृती इराणी यावेळेस मात्र मोठ्या फरकाच्या पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
राहुल गांधी यांनी ४ लाख मतांनी रायबरेलीतून विजय प्राप्त केला आहे.
-
त्यांच्या विरोधातील भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव झाला आहे.
-
तर स्मृती इराणी या खेपेला पिछाडीवर आहेत. मतमोजणीचे जे सुरुवातीचे कल हाती आले आहेत त्यातून काँग्रेसचे किशोरीलाल हे २० हजार मतांनी आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार