-
दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ रोजी तिच्यासोबत जे घडलं ते फारच धक्कादायक होतं.
-
अभिनेत्री असणारी ती चित्रिकरण संपवून घरी येत असताना काही लोकांनी रस्त्यामध्येच तिचं अपहरण केलं.
-
त्यानंतर धावत्या गाडीमध्येच तिचा लैंगिक छळ करण्यात आला.
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये मुख्य आरोपींमध्ये एका अभिनेत्याचं नाव पुढे आलं. पाच वर्षांपूर्वीचं हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणामध्ये याचिका दाखल केलीय. -
राज्य सरकारने या प्रकरणामध्ये अभिनेत्रीवरील अत्याचारासंदर्भाचतील याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केलीय. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे.
-
एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे वाटणारी ही घटना आहे केरळमधील. केरळ उच्च न्यायालयाने मल्याळी अभिनेत्री भावना मेननचा मारहाण झाल्याच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने दाखल केलेली याचिका स्वीकारलीय.
-
ही याचिका दाखल करुन घेण्यात आल्यानंतर भावनावर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन साक्षीदारांचा जबाब पुन्हा नोंदवण्यात येणार आहे. तसेच पाच नवीन साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेण्यास सांगण्यात आलंय.
-
भावानाचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये कनिष्ठ न्यायालयाने साक्षीदारांची पुन्हा चौकशी केली जावी, जबाब नोंदवावा यासंदर्भातील याचिका फेटाळली होती.
-
याच निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं.
-
या प्रकरणामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांमधील मोठं नाव असणाऱ्या गोपालकृष्णन् पद्मनाभ म्हणजेच दिलीप नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याचं नाव मुख्य आरोपी म्हणून आहे.
-
न्यायालयाने याचिका स्वीकारल्याने दिलीपच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.
-
केरळ उच्च न्यायालयाने ही यचिका स्वीकारल्याने आता या प्रकरणाकडे देशभरातील प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
-
सन २०१७ साली अभिनेत्री भावना सोबत धावत्या गाडीमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडवून दिली होती.
-
या प्रकरणामध्ये केरळ पोलिसांची गुन्हे शाखा अजूनही तपास करत आहे. याच तपासासंदर्भात सध्या नवे नवे खुलासे होताना दिसत आहेत.
-
मागील आठवड्यामध्ये राज्यातील पोलीस विभागाने या प्रकरणामध्ये अभिनेता दिलीप आणि पाच लोकांविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला.
-
दिलीप आणि इतर लोकांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
-
काही काळापूर्वीच निर्देशक बालचंद्र कुमार यांनी लैंगिक अत्याचारांच्या घटनांसदर्भात धक्कादायक खुलासे केल्यानंतर आता हे भावानाशीसंबंधित हे पाच वर्षांपूर्वीचं प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आलंय.
-
बालचंद्र कुमार यांनी केलेल्या खुलाश्यानंतर अभिनेत्रीने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहून विनंती केली होती.
-
आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी या भावनाने या पत्रामधून केली होती.
-
या पत्रामधून संपूर्ण प्रकरण काय आहे हे सांगतानाच आपल्या वेदना भावनाने सांगितल्या होत्या. या प्रकरणामधील आरोपींचा चौकशी होणं गरजेचं आहे. मला न्याय हवाय, असं भावनाने पत्रात म्हटलेलं.
-
या सर्व प्रकरणामध्ये अभिनेता दिलीपचा हात असल्याचा दावा केला जातोय. (फोटो इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)
-
भावनाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणामध्ये याचिका दाखल केलीय.
-
पाच वर्षांपासून या प्रकरणाबद्दल कुठेही वाच्यता न करणाऱ्या भावनाने आता या प्रकरणाबद्दल धक्कादायक दावे केलेत.
-
एक नोट शेअऱ करत भावनाने मागील बऱ्याच काळापासून आपण या तणावाखाली जगत होते, असं भावना म्हणालीय.
-
मला हिणवण्याची आणि शांत राहण्यासाठी अनेक प्रलोभनं दाखवण्यात आली, अनेक प्रयत्न करण्यात आल्याचा दावा भावानाने केलाय.
-
मात्र यामध्ये आपली काही चूक नसताना आपण बोलण्याचा निर्णय घेतल्याचं या अभिनेत्रीने सांगितलं आहे.
-
भावनाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
-
भावानाने या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळताना दिसतोय.
-
अनेकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोशल नेटवर्किंगवरुन केलीय.
-
सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच भावनाला पाठिंबा दिल्याचं चित्र पहायला मिळत आहे. (सर्व फोटो भावनाच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..