-
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले अंकित मगरेला गेल्या वर्षभरापासून डेट करत होती.
-
गेल्या काही दिवसांपासून रुपाली आणि अंकितचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
अभिनेत्री सई ताम्हणकरने २०१३ मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं.
-
२०१५ मध्ये सई ताम्हणकरने अमेय गोसावीला घटस्फोट दिला.
-
अभिनेता स्वप्नील जोशीने २००५ मध्ये अपर्णाशी लग्न केलं होतं.
-
लग्नाच्या चार वर्षांनंतर २००९ मध्ये ते विभक्त झाले.
-
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधान व शशांक केतकर एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
तेजश्री-शशांकने २०१४ मध्ये दोघांनी लग्न केलं पण लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
-
अभिनेता संग्राम समेळने २०१६मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न केले होते.
-
संग्राम आणि पल्लवीचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
-
अभिनेता सुयश टिळक ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘पाठकबाई’ म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरला डेट करत होता.
-
सुयश आणि अक्षयाचं नातं फार काळ टिकलं नाही.
-
अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती.
-
स्नेहाने अनिकेतच्या आई वडिलांवर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली.
-
हिंदी टीव्ही अभिनेता संजीव सेठशी रेशम टिपणीसने १९९३ मध्ये लग्नगाठ बांधली आणि २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा