-
भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त काळ चित्रपटगृहात चालणारा चित्रपट म्हणजे डीडीएलजे, अर्थात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’.
-
९० च्या दशकात मोठ्या पडद्यावरील राज आणि सीमरनच्या या प्रेमकहाणीला लोकांनी पसंती दर्शवली.
-
तब्बल २५ वर्षं या चित्रपटाने चित्रपटगृहांवर राज्य केलं. मुंबईच्या ‘मराठा मंदिर’मध्ये अजूनही या चित्रपटाचा एक शो दाखवला जातो.
-
चित्रपटातील शाहरुख काजोल ही जोडी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.
-
हा रेल्वे स्टेशनवरील सीन तर अजरामर झाला. यावर नंतर प्रचंड जोक्सदेखील व्हायरल झाले.
-
शाहरुख खानला रोमान्स किंग बनवण्यात या चित्रपटाचा मोठा वाटा आहे.
-
अभिनय, दिग्दर्शन याबरोबरच या चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू होती ती म्हणजे यातील श्रवणीय गाणी. ही गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
-
यातील सगळी गाणी सुपरहीट ठरली. जतिन ललित ही संगीतकारांची जोडी आणि बरोबर आनंद बक्षी यांचे शब्द यांनी अक्षरशः जादू केली.
-
यातील सर्वात जास्त लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे काजोलवर चित्रित झालेलं ‘मेरे ख्वाबोंमें जो आये’. या गाण्यामागील किस्सा म्हणजे हे गाणं २३ वेळा नाकरलं गेलं होतं.
-
गीतकार आनंद बक्षी यांनी हे गाणं तब्बल २३ वेळा लिहिलं आणि ते न आवडल्याने आदित्य चोप्राने ते प्रत्येकवेळी नाकारलं. त्यानंतर जेव्हा आनंद बक्षी यांनी त्यात बदल केले आणि मग ते गाणं फायनल झालं आणि हे गाणं सुपरहीट ठरलं.
-
‘डीडीएलजे’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्तम प्रेमकहाणी म्हणून गणला जातो.
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर सगळे रेकॉर्ड मोडीत काढलेच, शिवाय यामध्ये प्रत्येक कलाकाराला एक स्वतंत्र ओळख मिळवून दिली. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि फेसबुक)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल