-
अभिनेता स्वप्नील जोशीला सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार तू तेव्हा तशी या मालिकेसाठी मिळाला आहे. या मालिकेत तो पहिल्यांदा वेगळ्या भूमिकेत दिसला आहे.
-
नुकतीच सुरु झालेली मालिका ‘तू चाल पुढं’ या मालिकेतील अभिनेत्री दीपा परब ला सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला आहे.
-
श्रेयस, प्रार्थनाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे, मात्र आता त्यांना सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.
-
सून असावी तर अशी, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहरेला सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार मिळाला.
-
अभिनेत्री पल्लवी पाटीलला विशेष लक्षवेधी पुरस्कार ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेसाठी मिळाला आहे.
-
सर्वोत्कृष्ट सासूचा पुरस्कार ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील सासू मिथीला यांना मिळाला आहे.
-
अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालकाचा पुरस्कार ‘आम्ही सारे खवय्ये’ या मालिकेसाठी मिळाला आहे.
-
प्रसिद्ध अभिनेते अशोक समर्थ यांना सर्वोत्कृष्ट खलनायक हा पुरस्कार मिळाला आहे.
-
‘सिम्म्मी’ या व्यक्तिरेखेची सगळ्यांना चीड येते, सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार अभिनेत्री क्षितल क्षीरसागर यांना मिळाला आहे.
-
गेली ८ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्याला’ यंदा ही सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचा पुरस्कार मिळाला आहे.
-
प्रेक्षकांची लाडकी मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेला अनेक पुरस्कार मिळाले त्यातील एक पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट कुटुंब.
-
नुकतीच सुरु झालेली ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेने प्रेक्षकांचे वेधले, या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार देण्यात आला, मालिकेच्या संपूर्ण टीमने हा पुरस्कार घेतला. फोटो सौजन्य : झी मराठी इन्स्टाग्राम

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”