-
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी अलीकडेच पाकिस्तानमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून चांगलंच सुनावलं होतं.
-
“आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. एकूणच सध्या जे वातावरण तापलं आहे ते कमी व्हायला पाहिजे.”
-
“आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशापद्धतीने हल्ला झाला होता. ती लोकं नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते.”
-
“ही लोकं अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको”.
-
असं जावेद अख्तर त्या कार्यक्रमात म्हणाले होते.
-
पण जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानी लोक तसेच पाकिस्तानी कलाकार त्यांच्यावर भडकले आहेत.
-
पाकिस्तानी अभिनेता-निर्माता एजाज अस्लमने ट्वीटमध्ये लिहिलं की, “जावेद अख्तर यांच्या मनात इतका द्वेष असेल तर त्यांनी येथे यायला नको होतं. तरीही आम्ही तुम्हाला इथून सुखरूप जाऊ दिलं. तुमच्या मूर्खपणाला हेच आमचे उत्तर आहे.”
-
याशिवाय अनेक पाकिस्तानी युजर्सनीही त्यांच्यावर टीका केली होती.
-
तुम्हाला जर पाकिस्तान दहशतवाद्यांचा देश वाटतोय, तर तुम्ही इथे का आलात, तुम्हाला कोणी आमंत्रित केलं होतं? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया युजर्स देत होते.
-
(सर्व फोटो – फेसुबक)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्