-
शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे.
-
शिंदेंनी आपल्या पक्षाची साथ सोडण्यास कारणीभूत असलेल्या अनेक घटकांमध्ये खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंचाही समावेश आहे.
-
खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करणे हा शिंदेंच्या बंडामागील एक प्रमुख घटक असल्याचे मानले जात आहे.
-
श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदूत्ववादी मतदारांचा पगडा आहे.
-
या मतदारसंघामध्ये शिंदेंच्या मुलाला भाजपाच्या मदतीशिवाय विजय अशक्य आहे.
-
त्यामुळेच खासदारपुत्राचे राजकीय भवितव्य हाही एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत निर्णायक मुद्दा ठरल्याचे मानले जात आहे.
-
श्रीकांत शिंदे हे २०१४ पासून सक्रीय राजकारणामध्ये आहेत.
-
लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला.
-
शिवसेनेचा हा लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपले पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवले.
-
मुलाच्या प्रचारासाठी शिंदेंनी २०१४ मध्ये पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.
-
त्याचा परिणाम निकालामध्ये दिसून आला आणि श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगामध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले.
-
श्रीकांत शिंदेंनी अडीच लाख मतांनी विजय मिळवला.
-
त्यानंतर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही श्रीकांत शिंदेंनी विजय मिळवला.
-
यावेळेस त्यांनी ३ लाख ४४ हजार मतांनी विजय मिळवला.
-
३५ वर्षीय श्रीकांत शिंदे हे सर्वात तरुण खासदारांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
-
या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीच्या उमेदवारास चांगली लढतही देता आलेली नाही.
-
कल्याण डोंबिवली ते अंबरनाथ, उल्हासनगर या पट्टय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हिंदूत्वाचा प्रभाव आहे.
-
कल्याण-डोंबिवली तर संघाचा बालेकिल्ला मानला जातो.
-
अशा हिंदूत्ववादी विचारांचा पगडा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या मदतीशिवाय श्रीकांत शिंदे यांचा विजय शक्य नाही.
-
आतापर्यंत दोन वेळा खासदार झालेले श्रीकांत शिंदे हे भाजपाबरोबर जाऊन तिसऱ्या वेळीही खासदार होतील.
-
पुढच्या निवडणुकीत खासदार झाल्यावर त्या वेळीही देशात भाजपा सरकारच सत्तेवर येईल आणि त्या वेळी श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळेल.
-
कदाचित त्याआधीच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यताही नाकारता येणार नाही, असे समीकरण मांडण्यात आले आहे.
-
त्यामुळे ठाणे-कल्याण या आपल्या प्रभावाखालील भागात हिंदूत्ववादी मतदारांचे गणिताचा पूर्ण विचार शिंदेंनी बंड करताना केल्याचे समजते.
-
खासदारपुत्राच्या राजकीय भवितव्याचाही विचार शिंदे यांनी शिवसेनेत बंड करताना केल्याचे समजते.
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण व मुंब्रा कळवा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
-
यातील मुंब्रा-कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ आहे.
-
मागील काही काळापासून श्रीकांत शिंदे आणि आव्हाड यांचे मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
-
खास करुन कळवा, मुंब्रा मतदारसंघामध्ये शिंदे आणि आव्हाड असा संघर्ष दिसून आलाय.
-
या संघर्षाची चर्चा अगदी महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांपर्यंतही गेल्याचं समोर आलंय.
-
मुंब्रा-कळवा मतदारसंघ सोडला तर बाकी सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदूत्ववादी मतदारांचा प्रभाव आहे.
-
त्यामुळेच चार मतदारसंघांत भाजपा-शिवसेनेचे आमदार आहेत.
-
तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील हे आमदार असले तरी ते शिवसेनेच्या उमेदवाराला अगदी थोडक्या मतांनी पराभूत करून निवडून आले.
-
शिवाय मनसेही पूर्वीपासून हिंदूत्वाशी जवळीक ठेवणारा असाच राहिला आहे. आता तर मनसेनेही हिंदूत्ववादी भूमिका घेतली आहे.
-
श्रीकांत शिंदे हे आक्रामक तरुण खासदार म्हणून ओळखले जातात.
-
लोकल ट्रेनसंदर्भातील प्रश्न त्यांनी अनेकदा लोकसभेमध्ये उपस्थित केले आहेत.
-
एकनाथ शिंदेंनीही महाविकास आघाडीत असतानासुद्धा संघाशी असलेलं नातं जपलं.
-
त्यामुळेच शिंदेंच्या या बंडाच्या निर्णयामागे हिंदूत्वाच्या मुद्दासोबत मुलाचं राजकीय भविष्य हा मुद्दाही महत्वाचा असल्याचं सांगितलं जातंय.
-
दरम्यान, बुधवारपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन दाखल होणाऱ्या शिवसेना व अपक्ष आमदारांची संख्या वाढू लागली. मंगळवारी शिवसेनेसोबत असलेले आमदार हळूहळू गुवाहाटीला जाऊ लागले.
-
मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेसोबत असलेले आणखी पाच आमदार गुरुवारी दिवसभरात गुवाहाटीला जाऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले.
-
याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षात कायदेशीर फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश आमदारांचे म्हणजेच पक्षाच्या ५५ पैकी ३७ आमदारांचे संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्यापाशी झाले आहेत.
-
शिवाय शिवसेनेचे ९ सहयोगी अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने बंडातील आमदारांची एकूण संख्या ४६ झाली. (सर्व फाइल फोटो)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम