-
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूल अखेर शनिवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्रीनंतर एक वाजता स्फोट घडवून जमीनदोस्त करण्यात आला. (सर्व फोटो सौजन्य – ओश्विन कढाओ व पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटोज)
-
पूल पाडण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि तांत्रिक पथकाकाडून मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून तयारी करण्यात येत होती. (सर्व फोटो सौजन्य – ओश्विन कढाओ व पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटोज)
-
पुलाचा राडारोडा हटिवण्यासाठी काम पूर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. (सर्व फोटो सौजन्य – ओश्विन कढाओ व पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटोज)
-
चांदणी चौक आणि परिसरात सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक बंद होती.
-
स्फोट घडवून पाडण्यात आलेला पुण्यातील हा पहिलाच पूल असल्याने नागरिकांमध्येही त्याबाबत प्रचंड उत्सुकता होती.
-
महामार्गावरील चांदणी चौकात होणारी सातत्याने वाहतूक कोंडी सोडण्याच्या दृष्टीने पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
-
कमी वेळेत पूल पाडून त्याचा राडारोडा जमा करणे आणि वाहतूक कमी वेळेत पूर्ववत करण्यासाठी पूल स्फोटकाने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
-
त्यानुसार कोची आणि नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या कंपनीलाच हा पूल पाडण्याचे काम देण्यात आले. याच कंपनीने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्याचे काम केले होते.
-
कंपनीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला पुलाची आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर स्फोटके भरण्यासाठी छिद्रे पाडण्यात आली.
-
त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली. त्यापूर्वी शुक्रवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या परिसराची हवाई पाहणी केली.
-
पूल पाडण्यासाठी सुमारे ६०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. तांत्रिक रचनेनुसार घेतलेल्या १५०० हजार छिद्रांमध्ये ही स्फोटके भरण्यात आली होती.
-
शनिवारी सकाळपासून तांत्रिक पथकाकडून पूल पाडण्याच्या कामाची अंतिम तयारी करण्यात येत होती. शनिवारी रात्री सातारा आणि मुंबईकडून येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आली.
-
मुंबईकडून येणाऱ्या वाहतुकीतील हलकी वाहने तळेगाव येथूनच पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रात्री उशिरा चांदणी चौकाच्या परिसरातील सर्व भाग निर्मनुष्य करण्यात आला.
-
स्फोटाच्या परिसरात ठरावीक जबाबदार अधिकारी आणि तांत्रिक पथकाचीच उपस्थिती होती. तांत्रिक पथकाला सूचना मिळताच केवळ काही सेकंदाच्या अंतराने दोन स्फोट घडवून पूल पाडण्यात आला.
-
पूल पाडण्यासाठी रात्री आठपासूनच शेवटची तांत्रिक कामे सुरू करण्यात आली होती. स्फोटानंतर राडाराडा बाहेर उडू नये, यासाठी संपूर्ण पुलाला अच्छादित करण्यात आले.
-
आतील भागामध्ये स्फोटाची तीव्रता कमी करण्यासाठी वाळूच्या गोण्या आणि स्पंचचा वापर करण्यात आला. रात्री अकराच्या सुमारास या भागातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली.
-
त्याचप्रमाणे परिसरातून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले. पूल पाडण्याच्या कामात प्रत्यक्षात सहभागी असणाऱ्या मोजक्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना वगळता या भागात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही.
-
रात्री बाराच्या सुमारास स्फोटकांच्या वाहिन्या मुख्य सर्किटला जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. पूल पडण्याच्या शेवटच्या टप्प्यात सुमारे ४०० पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत सर्वांना बाहेर काढले.
-
त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेण्यात आली. शेवटी दहा आकड्यांची उलटी गणना सुरू करण्यात आली आणि दहापासून एक म्हणताच स्फोट झाला.
-
मात्र, स्फोटात पूल संपूर्ण पडला नाही. दोन्ही बाजूचा भाग तसाच शिल्लक राहिल्याने तो मशिनच्या मदतीने पाडण्यात आला. त्यामुळे काम संपवायलाही उशीर झाला.
-
याचा परिणाम सकाळी ८ वाजता सुरू होणारी वाहतूक १० वाजेपर्यंत खोळंबण्यात झाला. यामुळे काहीकाळ पुण्यात वाहतूक कोंडीही झाली.
-
चांदणी चौक येथील पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. १ हजार ३५० डिटोनेटरच्या सहाय्याने नियंत्रित स्फोटाद्वारे पूल पाडण्यात आला.
-
पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी एनएचएआयतर्फे नियुक्त करण्यात आले. पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले होते.
-
त्यात ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला. १ हजार ३५० डिटोनेटरच्या वापरातून हा नियंत्रित स्फोट करण्यात आला.
-
पूल पाडताना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला होता. (सर्व फोटो सौजन्य – ओश्विन कढाओ व पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटोज)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याकडून साताऱ्याकडे जात असताना २७ ऑगस्टला त्यांचा ताफा चांदणी चौकातील परिसरातच वाहतूक कोंडीमध्ये अडकला होता. त्यामुळे मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील या टप्प्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. (सर्व फोटो सौजन्य – ओश्विन कढाओ व पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटोज)
-
त्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही संबंधित ठिकाणी भेट दिल्यानंतर चांदणी चौकात महामार्गावरून जाणारा उड्डाणपूल पाडण्याचे निश्चित करण्यात आले. (सर्व फोटो सौजन्य – ओश्विन कढाओ व पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटोज)

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”