-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच कलावंतांच्या वाईट परिस्थितीवर भाष्य केलं.
-
ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) अहमदनगरमधील शिर्डी येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
आज आम्ही शासन आपल्या दारीमध्ये महिलांनाही लाभ दिला. एका वयस्कर कलावंतालाही लाभ दिला – अजित पवार
-
कोणताही कलाकार असला की त्याच्या अंगात ती कला असतेच – अजित पवार
-
त्या प्रत्येकाचा काळ असतो. त्या काळातच ती कला प्रेक्षकांच्या समोर सादर करण्याचं काम राज्यातील कलावंत करतात – अजित पवार
-
परंतु त्यांच्या उतारवयात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. कधीकधी तर त्या कलावंतांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही – अजित पवार
-
त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, जागृक आहे. त्यासाठी आज आपण कोट्यावधी रुपये खर्च करत आहोत – अजित पवार
-
आपल्या सर्वांचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही सगळी महामानवं आपल्याकडे होऊन गेले – अजित पवार
-
त्यांचा आदर्श ठेऊन आपण पुढे चाललो आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारापासून आम्ही यत्किंचितही बाजूला जात नाहीये – अजित पवार
-
या राज्यात व देशात महामानवांचा आदर केलाच गेला पाहिजे. त्याबद्दल कुणीही कुठलंही बेताल वक्तव्य करता कामा नये – अजित पवार
-
याबद्दलची खबरदारी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी घेत आहेत – अजित पवार
-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यात आहे – अजित पवार
-
त्यामुळे आजचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरच्या मातीत होत आहे – अजित पवार
-
याचा माझ्यासारख्याला मनापासून आनंद आहे – अजित पवार
-
सर्व छायाचित्र – संग्रहित

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”