-
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात आलेले दिसत आहेत. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)
-
काल (३१ मे) त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलासा दिला. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
यावेळी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. या बातचीतीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल एक घोषणा केली आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
जरांगे पाटील म्हणाले आहेत की “विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही (मराठा समाज) २८८ पैकी २८८ जागा लढवणार आहोत.” (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)
-
याचाच अर्थ महाराष्ट्राच्या सर्व विधानसभांच्या जागांवर उमेदवार उतरवून मनोज जरांगे पाटील निवडणूक लढण्याचा पावित्र्यात आलेले आहेत. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)
-
जर असं खरंच झालं तर महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही गट, शिवसेना दोन्ही गट, वंचित आणि भाजपा या पक्षांच्या पुढे मोठ आव्हान असेल. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)
-
मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)
-
त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे बोलले आहेत ते जर खरं झालं तर महाराष्ट्राचे राजकारण अजून रंगतदार बनेल यात शंका नाही. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)
-
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी कोणालाही पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली होती, त्यामुळे त्यांच्यावर नाराजी ही व्यक्त झाली. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)
-
परंतु आता मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)
-
आता या सगळ्यावर राजकीय वर्तूळातुन काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page) हे देखील पहा- PHOTOS : मनोज जरांगे पाटील यांनी न्यायालयात का लावली हजेरी? वाचा संपूर्ण माहिती

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल