





लोकसभा निवडणुकीत ‘चारशे पार’ करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना कधी नारा द्यावा लागला नव्हता. नारा न देता राजीव गांधी यांनी ‘चारशे पार’चा इतिहास घडविला. पण प्रचंड बहुमत मिळवूनही ते शिवसेनेशी कधी सुडाने वागले नाहीत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.




नेहरू कुटुंबीयांशी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची वागणूक योग्य नाही. देशासाठी नेहरू कुटुंबातील चार पिढ्यांनी योगदान दिलेले आहे. या कुटुंबाने देशाची जी पायाभरणी केली आणि देश उभा केला, त्याची नोंद कुणाला, काहीही करून पुसता येणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केले. राजीव गांधी यांचे श्रीपेराम्बुदूर येथे बॉम्बस्फोटात निधन झाले. त्या दुर्घटनेच्या आदल्या दिवशी रात्री राजीव गांधी यांची मुंबईत मोहंमद अली रोड येथे सभा झाली होती आणि ते त्या रात्री माझ्या ‘वर्षा’ निवासस्थानी मुक्कामाला होते, अशी आठवण पवार यांनी आपल्या भाषणात सांगितली.
